
लोकशाही दिनी ८६ तक्रार अर्ज दाखल; प्रलंबित अर्जांबाबत जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांच्या कडून आढावा
कोल्हापूर, दि.०२ : जिल्ह्यात महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा ‘लोकशाही दिन’ आज मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी प्राप्त झालेल्या सर्व अर्जांचे विहित मुदतीत निरसन करण्याचे निर्देश प्रशासकीय यंत्रणेला दिले तसेच प्रलंबित असलेल्या अर्जांचा आढावा घेतला. आजच्या लोकशाही दिनामध्ये एकूण ८६ नवीन अर्ज प्राप्त झाले.

जास्त कालावधीसाठी प्रलंबित अर्ज असणाऱ्या विभागांना कारणे दाखवा नोटीस देण्यात येणार आहेत. लोकशाही दिनास सर्व शासकीय आस्थापनांनी हजर राहण्याचे निर्देश देत त्यांनी गैरहजर विभागांना नोटीस बजावण्यात यावी अशा सूचना केल्या.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकरी गजानन गुरव, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, मुद्रांक उपजिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे, भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक शिवाजी भोसले यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
- 0
- 0
- 0
- 0





