नंदुरबार जिल्ह्यातील चिंचपाडा गावातील रेल्वे गेटजवळील काही प्रलंबित मागण्या व नागरिकांच्या दैनंदिन अडचणींबाबत उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांनी रस्ते वाहतूक, सुरक्षितता, वाहतुकीतील अडथळे तसेच गेटमुळे होणाऱ्या विलंबासंदर्भातील समस्या मांडल्या.
उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांनी नागरिकांशी संवाद साधत समस्यांची सविस्तर माहिती घेतली आणि संबंधित विभागांकडून तातडीने उपाययोजना करण्याबाबत आवश्यक सूचना दिल्या. पाहणीदरम्यान स्थानिक प्रशासन व ग्रामस्थांची उपस्थिती होती.
नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.


- 0
- 0
- 0
- 0





